
‘रामशेज’ याचा अर्थ ‘रामाचा पलंग’ असा होतो. रामशेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिकच्या उत्तर-पश्चिमेस १० किलोमीटर अंतरावर असलेला एक छोटासा किल्ला आहे.
असे मानले जाते की, प्रभू राम श्रीलंकेला गेले तेव्हा त्यांनी या किल्ल्यावर थोडा वेळ मुक्काम केला होता.
साडे सहा वर्षे चाललेल्या मुघल साम्राज्याविरुद्धच्या लढाईत ‘रामशेज’ किल्ल्याचा वापर करण्यात आला. किल्ल्याचे पहिले किल्लेदार सूर्याजी जाधव होते. त्यांची साडे पाच वर्षांनी बदली झाली आणि मराठा साम्राज्याच्या धोरणानुसार लवकरच नवीन किल्लेदाराची नियुक्ती करण्यात आली.

१६८२ मध्ये औरंगजेबाने सहाबुद्दीन खानला किल्ला जिंकण्यासाठी पाठविले. शाहबुद्दीन खानने आपली 40,000 मनुष्य सेना आणि मजबूत तोफखान्यासह काही तासांत किल्ला ताब्यात घेण्याचे वचन दिले, परंतु किल्ल्यातील 600 मराठा सैनिकांनी आपल्या चौक्या धरल्या आणि गोफणीच्या जोरदार रांगा लावून, गवताच्या ढिगाऱ्या पेटवून अनेक महिने सैन्याला मागे ढकलले. किल्लेदार सूर्याजी जाधव यांच्या नेतृत्वा खाली प्राणपणाने मावळे लढत होते. हा किल्ला शाहबुद्दीन खानला जिंकता आला नाही.
चक्रीय धोरणानुसार सुर्याजी जाधव यांची बदली होऊन दुसरा किल्लेदार आला. त्यानंतर किल्ल्यावर फितुरी झाल्यामुळे रामशेज किल्ला औरंगजेबकडे गेला.