
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतेही एक कारण नाही. नैराश्यात असताना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. त्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात.
‘बी-१२’ व ‘डी जीवनसत्व’ ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे एक मोठे कारण आहे. ‘डी’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशात फिरण्याचा उपाय अवलंबता येतो. ‘बी’ जीवनसत्वासाठी सुका मेवा, अंडी, चिकन तथा पनीरचे सेवन वाढवायला हवे. ‘सालमन’ माशाचे सेवनही यासाठी परिणामकारक आहे. टॉन्सिल्सचा त्रास असेल, निद्रानाशाचा त्रास असेल, सततच्या सर्दीमुळे नाक बंद राहण्याचा त्रास होत असेल तरी थकवा जाणवतो. याकरिता जास्त पाणी प्यावे. अनेकदा लोक जास्त पाणी पिण्यास आळस करतात. कारण, जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीस होते. पाणी जास्त प्यायल्याने ते तुमच्या शरीरातील ‘टॉक्सिन्स’ देखील काढून टाकत असते. पाणी कमी पिणे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. नेहमी लक्षात ठेवा, पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर निरोगी आणि सक्रिय राहते.

पौष्टिक अन्न जेवा. आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी अन्नाची गरज असते. पण पौष्टिक अन्न खाण्याऐवजी आपण बाजारात मिळणार्या खाद्यपदार्थाला प्राधान्य देतो. त्यामुळे आपल्या शरीरात थकवा आणि कमजोरी वाढते. दुसरीकडे, जर हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनेयुक्त अन्न खाल्ले तर तुम्ही निरोगी राहाल.
नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. दररोज एक तास व्यायाम केल्याने दिवसभरातील थकवा दूर होईल आणि निरोगी रहाल. पोषण, तंदुरुस्ती आणि एकूणच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सोपे व्यायाम करा. हळू चालणे, प्राणायाम आणि ध्यान करा.
आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. पुरेशी विश्रांती घ्या.
दररोज सकाळी 30 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.
एक खारीक,बेदाणे,दोन बदाम, रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले दोन अक्रोड सकाळी खावे.
जास्त साखर, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा.
पौष्टिक खिचडी एक दिवसाआड खावी.
आठवड्यातून 2-3 वेळा भाज्यांचे सूप प्यावे.
जिरे-बडीशेपचा चहा दिवसातून दोन वेळा म्हणजे जेवणानंतर एका तासाने प्यावा.
रात्री लवकर झोपावे. सकाळी लवकर उठावे. सकाळच्या वेळी चालण्यास जावे.