
बल्लाळेश्वर मंदिर हे एक जगप्रसिद्ध गणपती मंदिर आहे. अष्टविनायक मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतपासून सुमारे ६० किमी अंतरावरील पाली गावात हे आहे. हे ठिकाण ‘सागरगड’ किल्ला आणि ‘अंबा’ नदीपासून जवळच आहे.
गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातील हा एकच असा गणपती आहे,की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. ‘बल्लाळ’ हा गणपतीचा असीम भक्त होता. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनविले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. पुण्यापासून बल्लाळेश्वर ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे बल्लाळेश्वरला जाता येते.

असे म्हणतात की, मोरेश्वर विठ्ठल सिंदकर (दिघे) यांनी इसवी सन १६४० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात एक पुरातन घंटा असून ती चिमाजी आप्पांनी लढाईत पोर्तुगीजांना पराभूत करून आणली होती. १७६० साली मूळ लाकडी मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. नाना फडणवीस यांनी दगडी मंदिर आकारास आणले.
या मंदिरात भाविकांची नेहमी वर्दळ असते.