भारतातील साखर उद्योग
भारतातील बहुतांश साखरेचे उत्पादन स्थानिक सहकारी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या गिरण्यांमध्ये होते. लहानमोठ्या सर्व शेतकऱ्यांकडून ऊसपुरवठा केला जातो. स्थानिक साखर कारखानदारांनी गेल्या पन्नास वर्षांत राजकीय संबंध प्रस्थापित करण्यात आणि राजकारण्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
साखर सहकारी गट, साखर कारखाने आणि स्थानिक राजकारण यांच्यात सहजीवन संबंध प्रस्थापित झाले आहेत. साखर हे स्फटिकासारखे अन्न आहे. त्यात प्रामुख्याने सुक्रोज, लॅक्टोज आणि फ्रॅक्टोज असतात. साखर ही फळे, मध आणि इतर विविध पदार्थांमध्ये देखील आढळू शकते. मारवाडीत याला ‘खोड’ किंवा ‘मुरा’ असे म्हणतात. साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेह अधिक सामान्य झाला आहे.

जगात साखरेचा सर्वाधिक वापर ब्राझीलमध्ये आहे. भारतातसुद्धा सर्वाधिक साखरेचा वापर केला जातो. ग्रामीण भारतामध्ये साखर उद्योग हे सर्वात मोठे कृषी आधारित क्षेत्र आहे. लागवड, कापणी आणि संबंधित प्रक्रियेतील ५ दशलक्ष ऊस उत्पादक, त्यावर अवलंबून असलेली माणसे आणि मोठ्या संख्येने कृषी शेतकरी यावर अवलंबून आहेत.
भारतात अलीकडे साखर आणि संबंधित गोड पदार्थांचा वापर वाढला आहे. भारताची वाढती लोकसंख्या आणि तिची सुधारलेली आर्थिक परिस्थिती ही साखरेच्या वाढत्या मागणीची दोन प्रमुख कारणे आहेत. गिरण्यांद्वारे निर्माण होणाऱ्या साखरेचा थेट वापर करणारे बहुतांश व्यवसाय म्हणजे बेकरी, छोट्या शहरातील मिठाई उत्पादक होत. मिठाई विकणारे स्थानिक व्यवसाय हे खांडसरीचे मुख्य ग्राहक आहेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ उत्पादक सर्वजण साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. साखर उसाच्या कच्च्या मालापासून तयार होते. साखर उद्योग हा कृषी-आधारित देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. उत्तर प्रदेश हे उसासाठी सर्वाधिक क्षेत्र आहे. भारत हा जगातील ऊस व साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा साखर उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. आणि उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे या जिल्ह्यात ३५ टक्के साखर उत्पादन तयार होते. उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर, देवडीया, मेरठ, सहारनपुर येथे २४ टक्के साखर उत्पादन होते. तामिळनाडूमध्ये कोईमतुर, तिरुचिरापल्ली, करुर, तिरुप्पुर येथे साखर उत्पादन ९.५३ टक्के होते. आंध्रप्रदेशमध्ये पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, चित्तूर येथे ५.८ टक्के साखर उत्पादन होते. गुजरातमध्ये सुरत, भावनगर,अमरेली, बनासकांठा, जुनागढ येथे ५.५६ टक्के साखर उत्पादन होते. भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे, असे ओळखले जाते. १०० टन उसापासून १० ते १२ टन साखर मिळते.