वसई किल्ला

वसई किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे. ‘बेसिन किल्ला’ या नावाने वसई किल्ला प्रसिद्ध होता.वसई किल्ला हा वसईतील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वीच्या काळी वसईला ‘बेसिन’, ‘बस्या’, ‘बाजीपूर’ अशा अनेक नावांनी ओळखले जात असे. व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी वसईला भारतातील मुख्य व्यापारी व लष्करी तळ बनविण्याचा निर्णय घेतला; आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला.

वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी 1536 मध्ये बांधला होता. या किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले आहे, त्यामुळे वसई किल्ल्याचे सौंदर्य खुलते. हा वसई किल्ला एकूण 110 एकर परिसरात पसरलेला आहे. त्यामुळे हा किल्ला आकाराने खूप मोठा आहे.वसई किल्ला हा तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी एक जमिनीच्या बाजूने उघडते; आणि दुसऱ्या बाजूला भव्य तटबंदी आहे.

पूर्वी वसईच्या किल्ल्यावर व्यापारी कारागीर असायचे. इथे संपूर्ण गाव वसलेले होते. वसईच्या किल्ल्यावर चर्च, महाविद्यालय, धान्य कोठार, वाचनालय, रुग्णालय आणि गजबजलेली बाजारपेठ होती. त्यामुळे हे ठिकाण व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते. मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या हातून हा किल्ला घेण्याचे ठरवले. 1737 साली हा प्रयत्न केला गेला; पण मराठ्यांना हा किल्ला ताब्यात घेता आला नाही. हे प्रयत्न निष्फळ ठरले.

यानंतर बाजीराव पेशवे यांनी वसई किल्ला जिंकण्याची जबाबदारी त्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्यावर सोपवली. 1738 मध्ये चिमाजी अप्पांनी वसई किल्ला ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली. त्यांनी वसईच्या किल्ल्यावर हल्ला केला. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांसोबत झालेल्या वसईच्या लढाईत ‘सेंट सेबस्तियन’ बुरूज सुरूंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते. २ मे १७३९ रोजी झालेली लढाई दोन दिवस चालली. या लढाईत अनेक पोर्तुगीज मारले गेले. पोर्तुगीजांनी त्यांचा दारूगोळा आणि लढण्याचे धैर्य गमावले; आणि पोर्तुगीजांचा पराभव झाला. अशा प्रकारे मराठ्यांनी किल्ला जिंकला.

वसई किल्ल्याच्या भिंतीवर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजयाचे शिलालेख सापडतील. त्यानंतर 1780 मध्ये इंग्रजांनी वसई किल्ला ताब्यात घेण्याची योजना आखली.त्यावेळी विसाजी लेले हे वसई किल्ल्याचे किल्लेदार होते. 28 ऑक्टोबर रोजी मारामारी होऊन गोळीबार सुरू झाला. अखेर १२ डिसेंबर रोजी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.वसईचा किल्ला महत्त्वाच्या ठिकाणांकडे लक्ष देण्याच्या आणि मजबूत करण्याच्या हेतूने बांधला गेला.

त्यामुळे वसई किल्ल्यावर अनेक शस्त्रे, सैनिक आणि खजिना असायचा. हा किल्ला त्याकाळी अत्यंत महत्वाचा किल्ला होता. वसईच्या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे पाणी आहे; आणि गडावर जाण्यासाठी एका बाजूला जमीन वापरता येत असल्याने किल्ला अतिशय सुरक्षित होता. या किल्ल्याच्या जमिनीच्या बाजूला खूप उंच भिंती आहेत त्यामुळे या किल्ल्यावर जमिनीच्या बाजूनेही हल्ला करणे अवघड होते. वसईच्या किल्ल्याला दहा कोन असून त्या प्रत्येक बुरुजाला नाव दिले आहे. ‘नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया’, ‘रैस मागो’, ‘सेंट गोंसोले’, ‘माद्रद दीय’, ‘एलिफांत’, ‘सेंट पेद्रू’, ‘सेंट पॉल्स’, ‘सेंट सेबस्तियन’ आणि दहावा ‘सेंट सेबस्तियन कावलिरो’ बुरूज अशी या दहा बुरुजांची नावे होती.

गडाच्या बुरुजांची लांबी सुमारे एक किलोमीटर आहे. त्यावेळी अशा लढायांसाठी उपयुक्त असलेल्या बुरुजांवर बंदुका आणि रायफल ठेवल्या जात.किल्ल्याच्या बुरुजावर सैनिकांच्या अनेक तुकड्या तैनात होत्या. बुरुजावर मुक्काम करून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देता येत होते. प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक व त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात करण्यात येत असे. किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच आणि 5 फूट रुंद असल्यामुळे अतिशय मजबूत आहे.एखाद्या वेळी शत्रूने अचानक हालचाल केली तर ते सुरक्षितपणे किल्ल्यावरून बाहेर पडावेत या हेतूने गडावर अनेक चोर दरवाजेही आहेत.तसेच या किल्ल्यावर समुद्रातून येणारा भुयारी मार्गही पहायला मिळतो. हा भुयारी मार्ग खूप लांब आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *