
‘गोराई’ सागरकिनारा हा मुंबईतील गोराई परिसरात असलेला एक लोकप्रिय किनारा आहे. निसर्गरम्य सौंदर्य आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्याच्या लांब पट्ट्यासाठी हा ओळखला जातो, ज्यामुळे पोहणे, सूर्यस्नान आणि इतर जलक्रीडांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
याठिकाणी अनेक परवडणारी रिसॉर्ट्स आहेत; ज्यामुळे हा किनारा कुटुंबियांचा वेळ आनंदात व्यतीत करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

नैसर्गिक आकर्षणांव्यतिरिक्त, गोराई किनाऱ्यावर अनेक मनोरंजन पार्क आहेत, जे सर्व वयोगटातील पर्यटकांना आनंदाची अनुभूती देतात. येथून जवळ ‘विपश्यना पॅगोडा’ हे ध्यान केंद्र आहे .
‘गोराई’ किनाऱ्यावर येणारे पर्यटक मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ वरून फेरीने किंवा मुंबई-अहमदाबाद महामार्गाने रस्त्याने सहज समुद्रकिनाऱ्यावर पोहोचू शकतात. सुंदर देखावे, मनोरंजक आकर्षणे आणि परवडणाऱ्या निवास स्थानांसह ‘गोराई’ सागरकिनारा हा मुंबईला जाणाऱ्या प्रत्येकासाठी आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे.