
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील सिद्धिविनायक मंदिर हे गणपती बाप्पांच्या भारतातीलच नव्हे, तर परदेशाततील प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे. सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे वळलेली आहे. माहितीनुसार, अशा गणेशाच्या मूर्ती असलेल्या मंदिरांना ‘सिद्धपीठ’ असे म्हणतात; म्हणून त्यांना ‘सिद्धिविनायक मंदिरे’ म्हणतात.
सिद्धिविनायकाचे मंदिर पूर्वी खूपच लहान होते. सुरुवातीला मंदिर केवळ केवळ विटांचे होते. घुमटाच्या आकाराचे शिखर होते. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करून आकार वाढवण्यात आला. हे सिद्धिविनायक मंदिर 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विठू पाटील नावाच्या स्थानिक ठेकेदाराने बांधले. या मंदिराच्या बांधकामासाठी एका शेतकरी महिलेने पैसे दिले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला मूलबाळ नव्हते. त्या महिलेला बाप्पाच्या मंदिर बांधकामासाठी मदत करायची होती, असे बोलले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे दरवाजे सर्व धर्माच्या लोकांसाठी खुले आहेत. सिद्धीविनायक मंदिरातील मंगळवारची आरती खूप प्रसिद्ध आहे, ज्यावेळी 2 किलोमीटरपर्यंत भक्तांची रांग असते.

गणेशमूर्ती काळ्या दगडाची आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे आहे. भगवान गणेश आपल्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धीसह येथे विराजमान आहेत. या मूर्ती अतिशय आकर्षक दिसतात. शुभ फलदायी सिद्धिविनायक मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणले जाते. माहितीनुसार, या मंदिराला दरवर्षी 100 दशलक्ष ते 150 दशलक्ष देणगी मिळते. या मंदिराची देखभाल करणारी संस्था मुंबईतील सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे. सिद्धिविनायकाला ‘नवसाचा गणपती’ किंवा ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा कोणी भक्त सिद्धिविनायकाची मनापासून प्रार्थना करतो, तेव्हा बाप्पा त्याची इच्छा नक्कीच पूर्ण करतो. मंदिराच्या आत चांदीच्या दोन मोठ्या उंदरांच्या मूर्तीही आहेत. जे भक्त त्यांच्या कानात त्यांची इच्छा सांगतात, उंदीर त्यांचा संदेश भगवान गणेशाला पोहोचवतात. त्यामुळेच या मंदिरात भाविकांची गर्दी असते.