
पट्टा किल्ला, ज्याला विश्रामगड म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि अहमदनगर दरम्यान वसलेला एक किल्ला आहे. भारतीय शासक शिवाजीमहाराजांनी एकदा तेथे जाऊन विश्रांती घेतली होती. पट्टा किल्ल्याचे रहिवासी पट्टेकर म्हणून ओळखले जातात. पट्टा किल्ला समुद्रसपाटीपासून अंदाजे १,३९२ मीटर उंचीवर आहे.
हा किल्ला बहमनी सल्तनतमध्ये होता. इ.स. १४९० मध्ये बहामनी साम्राज्याचे विभाजन झाल्यावर हा किल्ला अहमदनगरच्या निजामाने ताब्यात घेतला. इ.स. १६२७ मध्ये तो मुघलांनी जिंकून घेतला. इ.स. १६७१ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला ताब्यात घेतला, पण १६७२ मध्ये मुघलांनी तो पुन्हा ताब्यात घेतला. इ.स. १६७५ मध्ये हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी ताब्यात घेतला.

पट्टा एकेकाळी स्वराज्याच्या सीमेवर होता. जालनापूर येथील लढाईनंतर नोव्हेंबर १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर आले. बहिरजी नाईक या गुप्तहेर व लष्करी सेनापतीमुळे छत्रपती शिवाजी महाराज पाट्यापर्यंत सुखरूप पोहोचू शकले.
११ जानेवारी १६८८ रोजी हा किल्ला माताबरखानच्या नेतृत्वाखालील मुगल सैन्याने ताब्यात घेतला. पुढे पेशव्यांनी १७६१ मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिश सैन्याने जिंकला. पट्टा किल्ला चढायला सरळ आहे. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने किल्ल्याभोवती पायऱ्या विकसित केल्या आहेत.