
‘सुमारगड’ हा किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. हा किल्ला डोंगररांगेच्या मध्यभागी असून उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेला आहे. हा सह्याद्रीला समांतर असणारा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यात अडचण येते. याची उंची आणि खडतर चढण यामुळे केवळ डोंगराळ भागात गिर्यारोहण करणाऱ्यांना या किल्ल्यावर जाता येते. किल्ल्याच्या सर्व बाजूंना खडकाचे सरळ पृष्ठभाग आहेत. गडावर जाण्यासाठी काही खडक चढून शिखरावर असलेल्या किल्ल्यावर जावे लागते. या गडावर पाण्याची टाकी आहे.
एका कुंडात शिवलिंग आणि एका गुहेत ‘भैरीभवानी’, ‘झोलाई’, ‘वाघजाई’ आणि ‘नवलाई’ या देवतांच्या मूर्ती आहेत. या किल्ल्यातून पूर्वेकडील ‘वासोटा’ आणि ‘मकरंदगड’ या सह्याद्रीच्या किल्ल्यांचे दर्शन घडते. पश्चिमेला ‘पालगड’ आणि ‘मंडणगड’ हे सह्याद्रीचे मध्य किल्ले पहायला मिळतात. या गडाच्या इतिहासाविषयी फारशी माहिती मिळत नाही. या गडावर पूर्वी देवीच्या स्मरणार्थ उत्सव भरवला जात होता, असे ग्रामस्थ म्हणतात. खांबाचा तोल साधताना दोन गावकरी कठडा कोसळून खाली पडले, तेव्हापासून हा उत्सव ‘रसाळगडा’वर हलविण्यात आला. आजकाल फक्त गिर्यारोहक या किल्ल्याला भेट देतात. गडावर जाण्याचा मार्ग नेहमीच्या वापरात नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकाची आवश्यकता आहे.

येथे विमानाने जायचे झाल्यास मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. रेल्वेने गेल्यास खेड हे सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे. रस्त्याने गेल्यास मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथून थेट एसटीने खेडला जाता येते. गोव्याहून येताना महामार्गावरील चिपळूण किंवा भरणे नाका येथे उतरून खेडला यावे लागते. खेड हे मुंबई आणि गोव्यालाही रेल्वेने जोडलेले आहे.