
हिंसाचारग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत कारवाई सुरूच ठेवली आहे. ‘जेद्दाह’ येथून 186 प्रवाशांना घेऊन 9 वे विमान भारताकडे रवाना झाले आहे. तत्पूर्वी, रविवारी या मोहिमेअंतर्गत 229 जणांच्या आणखी एका गटाला भारतात आणण्यात आले. हे लोक बंगळुरुला पोहोचले याच्या एक दिवस आधी सुदानमधून ३६५ लोक दिल्लीत पोहोचले होते. ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत आणखी एका विमानाने 229 प्रवाशांना बंगळुरूला आणले, असे ट्विट परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

निर्वासन मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवारी 754 लोक 2 गटात भारतात पोहोचले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, सुदानमधून आतापर्यंत 1,954 लोकांना परत आणण्यात आले आहे.
‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत भारत निर्वासितांना सौदी अरेबियातील ‘जेद्दाह’ शहरात घेऊन जात आहे. तेथून त्यांना मायदेशी आणले जात आहे. एकूण 360 नागरिकांचा पहिला गट बुधवारी विमानाने नवी दिल्लीत आणण्यात आला. दुसऱ्या गटाला भारतीय हवाई दलाच्या ‘सी-17 ग्लोबमास्टर’ विमानाने २४६ नागरिकांना मुंबईत आणले गेले.