Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

अ जीवनसत्वाचे महत्त्व

‘अ’ जीवनसत्व शरीरासाठी फार आवश्यक आहे. ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावामुळे मुलांची दृष्टी कमी होते. रातांधळेपणा होतो. हा अभाव जर खूपच असेल, तर त्यामुळे कायमचे अंधत्वही येऊ शकते.

‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या मुलांमध्ये अंधत्व एकदम येत नाही. निदान लवकर झाल्यास ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असा आहार देऊनही समस्या दूर करता येते. भारतात ‘अ’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दरवर्षी 30,000 मुलांची दृष्टी जाते. 1 ते 5 वर्षे वयाच्या मुलांमध्ये ही कमतरता अधिक असल्याचे दिसून येते.

यामुळे रातांधळेपणासुद्धा येतो. मुलांना कमी उजेड असताना किंवा अंधारात काही दिसत नाही. ही लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच उपचार न केल्यास ही स्थिती कायमच्या अंधत्वात रुपांतरित होऊ शकते.

यासाठी ‘अ’ जीवनसत्व भरपूर असलेले अन्न सेवन करावे. दूध, अंडी, मासे, तेल यात ‘अ’ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. पालेभाज्या, हिरव्या भाज्या, गाजर, पपई, आंबा ही फळे ‘अ’ जीवनसत्वाने समृध्द असतात.

कुपोषणामुळे मुले खूपच अशक्त असतात. प्रारंभिक टप्प्यात मुलांना अतिसार होतो. त्यांची त्वचा कोरडी होते. उष्मांक, जीवनसत्व आणि प्रथिने यांनी समृद्ध असलेला पोषक आहार मुलांना पुरेशा प्रमाणात दिला पाहिजे. गर्भवती महिलांनी ‘अ’ जीवनसत्व असलेले पोषक अन्न घ्यावे. त्यामुळे गर्भाला आईकडून ते मिळण्यात मदत होते. वाढीच्या वयातील मुलांना पोषक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *