
उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध केदारनाथ धामची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेस अद्याप 10 दिवसही झाले नाहीत. येथे सोमवारी रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीत ‘बाबा केदार’ यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबच लांब रांगा लावून उभे आहेत. दुसरीकडे, सखल भागात पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून केदारनाथमध्ये सध्या अवकाळी बर्फवृष्टी होत आहे. या बर्फवृष्टीमुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणीवर ३ मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथच्या उंच भागात बर्फवृष्टी होत असताना खालच्या भागात पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे वरच्या भागात बर्फवृष्टी न झाल्याने सखल भागातील शेतकरी चिंतेत पडले होते. ‘जाखोली’ परिसरात गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कांदा, वांगी, टोमॅटो, अक्रोड, संत्री, पीच, माल्टा, आंबा, सफरचंद या महागड्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. संततधार पाऊस आणि गारपिटीमुळे जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे समजते.