Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

शरद पवार यांची पक्षाध्यक्ष पद सोडण्याची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. आपण राजकारणापासून बाजूला होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी मंगळवारी जाहीर केले.

यावेळी शरद पवार म्हणाले, ”सन १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला हा प्रवास गेली ६३ वर्षे अविरत सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य म्हणून सातत्याने काम करीत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालण्यावर माझा भर असेल.”

शरद पवार यांनी केलेल्या या अनपेक्षित घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.

शरद पवार 10 वर्षांहून अधिक काळ मुंबई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर 2005 ते 2008 पर्यंत ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आणि 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रमुखही होते. सलग 5 वर्षे शरद पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची 3 वेळा शपथ घेतली. सन 2004 ते 2014 पर्यंत ते मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. याशिवाय पवार यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणूनही काम केले आहे. शरद पवार यांच्या राजकीय आणि व्यावहारिक आचरणामुळे त्यांचे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाशी संबंधही चांगले आहेत. सध्याच्या मोदी सरकारने त्यांना 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ देऊन सन्मानित केले होते, जो देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *