Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

माता अर्भकांबाबत आरोग्य संघटनेचा अहवाल

गर्भवती महिला, माता आणि अर्भकांचे अकाली मृत्यू कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने नवीन अहवाल सादर केला आहे. गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणादरम्यान माता आणि बालमृत्यू कमी करण्याचा दर गेल्या 8 वर्षांत स्थिर आहे. सध्याच्या दरानुसार, 60 पेक्षा जास्त देश 2030 पर्यंत हे मृत्यू कमी करण्याचे त्यांचे लक्ष्य गाठण्यापासून दूर आहेत. सन 2015 पासून, दरवर्षी सुमारे 2.90 लाख माता मृत्यू, 19 लाख मृत अर्भक आणि 23 लाख नवजात बालकांचा जन्माच्या पहिल्या महिन्यात मृत्यू होतो.

शंभरहून अधिक देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रत्येक 10 देशांपैकी फक्त एका देशाकडे आरोग्य योजना लागू करण्यासाठी पुरेशी आर्थिक संसाधने असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी सुमारे 4.5 दशलक्ष महिला आणि बाळांचा गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात किंवा जन्मानंतरच्या सुरुवातीच्या आठवड्यात मृत्यू होतो. दर 7 सेकंदाला होणारा हा मृत्यू योग्य उपचारांद्वारे टाळता येऊ शकतो.

संघटनेमधील माता, नवजात बालक, किशोरवयीन आरोग्य आणि वृद्धत्व समिती संचालक डॉ. अंशू बॅनर्जी म्हणतात की, सध्याच्या तुलनेत वेगळे परिणाम पाहण्यासाठी देशांना प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. सन 2014 मध्ये, 190 पेक्षा जास्त देशांनी याला पाठिंबा दिला. अर्भकांमध्ये मृत जन्माचे आणि अकाली मृत्यूचे दर कमी करण्याची योजना आखली. नंतर माता मृत्यूचे प्रमाण प्रति 1,00,000 जिवंत जन्मांमागे 70 पेक्षा कमी करण्याचे जागतिक लक्ष्य निश्चित केले.

अहवालात म्हटले आहे की, सन 2000 ते 2010 दरम्यान, यासंदर्भात प्रगती खूप वेगवान झाली होती. नंतर परिस्थिती मुख्यतः निधीच्या कमतरतेमुळे आणि इतर कारणांमुळे बिघडली. या अहवालात समाविष्ट असलेल्या 106 देशांपैकी केवळ 12 टक्के देशांनी माता आणि नवजात शिशू आरोग्य योजनांना पूर्णपणे निधी दिला होता. जगातील सर्वाधिक माता आणि बालमृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू 10 देशांमध्ये झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *