
केसांच्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी केसांना शाम्पू लावला जातो. त्याचा उचित फायदा मिळण्यासाठी या शाम्पूचा योग्य वापर कसा करायचा, हे माहीत करून घ्यायला हवे. चुकीच्या पद्धतीने शाम्पू लावल्याने त्यात असलेल्या रसायनांचा प्रभाव अधिक होतो. ते केसांची टाळू आणि केसांचा पोत बिघडवू लागतात. प्रसिद्ध केस तज्ज्ञ जावेद हबीब यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर काही मौलिक सल्ले दिले आहेत.
केस धुताना तळहातावर शाम्पू घेतला जातो, आणि तो थेट केसांवर चोळला जातो. या पद्धतीमुळे केसांचे नुकसान होते. शाम्पू वापरण्यापूर्वी आधी पाण्यात मिसळावा आणि मगच वापरावा. असे केल्याने तो थेट केसांवर आणि मुळांवर लागू होणार नाही. त्यातील रसायने केसांना हानी पोहोचवू शकणार नाहीत.

शाम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. असे केल्याने केस कमकुवत होत नाहीत. त्यांची ताकद टिकून राहते. केस कोरडे होत नाहीत. केस रसायनांच्या प्रभावापासून सुरक्षित राहतात. केसांचा रंग चांगला राहतो. शाम्पू केल्यानंतर ते मऊ राहतात. जेव्हाही तुम्हाला शाम्पू करायचा असेल तेव्हा आधी डोक्याला कोणत्याही केसांच्या तेलाने मसाज करावे. 10 मिनिटांनंतर शाम्पू पाण्यात मिसळून केसाना चोळावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. यामुळे शाम्पूचा योग्य प्रभाव केसांवर राहील.