
मुंबई आणि गोव्यातील समुद्रकिनारे फार वर्दळीचे वाटत असतील तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात शिरोडा किनारा हा एक शांत आणि आरामदायी समुद्रकिनारा आहे. येथे खाद्यपदार्थ, रिसॉर्ट्स, जलक्रीडा इत्यादी सुविधादेखील आहेत.
शिरोडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. वेंगुर्ला शहरापासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक साज आहे. दांडी यात्रेप्रमाणेच मीठ सत्याग्रह चळवळीचे हे एक ठिकाण आहे. सन 1930 च्या दशकात येथे मिठाचा सत्याग्रह झाला. डोलणारी ताडाची झाडे, नारळाची झाडे आणि पांढरी वाळू हे येथील वैशिष्ट्य आहे. पहाटेचा तेजस्वी सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी हा 5 किमी लांबीचा समुद्रकिनारा सर्वोत्तम आहे. या किनाऱ्यावर बाहेरची रहदारी कमी आहे. समुद्रकिनाऱ्यावर ‘सीगल्स’ आणि ‘किंगफिशर’ चे आवाज ऐकू येतात. येथे मासेमारीचा व्यवसाय करणारे बांधव आपणास दिसतील.

या किनाऱ्यावर आलात तर रेडी हा एक ऐतिहासिक किल्ला येथून जवळ आहे. ‘इस्मार्ट शंकर’ या तेलुगु चित्रपटाचे काही चित्रीकरण या किल्ल्यात झाले होते. या किल्ल्याला ‘रेडी किल्ला’ असेही म्हणतात. येथे किनाऱ्यावर खेकडे आणि कासवदेखील दिसतात. या किनाऱ्याला ‘वेळागर किनारा’ असेही म्हणतात.