
”पत्रकारिता स्वातंत्र्याबाबत मी माझा स्वतःचा अहवाल तयार करून भारताला पहिले स्थान देऊ शकतो. अशा प्रकारचे मत कोण देते यावर सर्व अवलंबून आहे,” असे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केले.
‘रिपोर्ट्स सॅन्स फ्रंटियर्स’ या ‘ना नफा’ तत्वावर चालणाऱ्या संस्थेने प्रकाशित केलेल्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक घसरला आहे,” अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम. जोसेफ यांनी मंगळवारी दिली. बिल्कीस बानोप्रकरणी सुनावणीदरम्यान त्यांनी ही टिप्पणी केली त्यावेळी ते बोलत होते. वकील वृंदा ग्रोव्हर यांनीही जोसेफ यांच्या मताला सहमती दर्शवली.
“भारतात एक लाख वृत्तपत्रे आणि साप्ताहिके आहेत. माझ्या मताचा गैर अर्थ निघणार नाही; परंतु, रँकिंगमध्ये पत्रकारिता स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण १६१ व्या क्रमाकांवर आहोत”, असे न्यायाधीश जोसेफ यांनी सांगितले.
जागतिक स्वातंत्र्य निर्देशांकाच्या ताज्या अहवालानुसार, रवांडा (१३१), पाकिस्तान (१५९) आणि अफगाणिस्तान (१५२) क्रमांकावर आहे. भारत यांच्याही मागे असून १६१ व्या क्रमांकावर आहे. सन २०२२ मध्ये भारत १५० व्या क्रमांकावर होता. आता ११ क्रमांकाने घसरण झाल्याचेही त्यांनी सांगितले.