Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ईशान्येकडील राज्यांना पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ सक्रीय झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाने ईशान्येकडील राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. दिनांक 13 आणि 14 मे रोजी हवामान आणखी बिघडू शकते. या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वाधिक पाऊस पडेल. ‘मोचा’ चक्रीवादळ पुढे सरकले की उर्वरित राज्यांमध्येही हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
 
‘मोचा’ वादळादरम्यान 150-160 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. हा वेग प्रति तास 175 किमी आहे. त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये दिनांक 13 आणि 14 मे रोजी पाऊस पडेल. राज्याच्या काही भागात जास्त पाऊस पडेल. नागालँड, मणिपूर, दक्षिण आसाममध्ये दिनांक 14 मे रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर दिनांक 12 ते 14 मे रोजी मुसळधार पाऊस पडेल. ‘मोचा’ चक्रीवादळ उत्तर आणि ईशान्येकडे सरकणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. 

या वादळाचा परिणाम भारतावरच नाही तर दक्षिण-पूर्व बांग्लादेश आणि उत्तर म्यानमारच्या सीमेवरही होणार आहे. याच कारणामुळे बांगलादेशातील ‘कॉक्स’ बाजार आणि म्यानमारमधील बाजारपेठा १४ मे रोजी बंद ठेवण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाला ‘मोका’ किंवा ‘मोचा’ असे नाव देण्यात आले आहे. प्रादेशिक आधारावर चक्रीवादळांची नावे दिली जातात. जागतिक हवामान संघटना आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक-सोशल कमिशन हे चक्रीवादळांना नावे देणारे गट आहेत. ‘मोचा’ चक्रीवादळ हे येमेनने दिलेले नाव आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *