सागरी किनारा मार्गास संभाजी महाराजांचे नाव
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव दिमाखात संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मुंबईतील सागरी किनारा मार्गास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येईल, तसेच या महामार्गाच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती यंदा पहिल्यांदाच मुंबईतल्या ‘गेटवे ॲाफ इंडिया’ येथे साजरी होतेय याचा आनंद आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव… pic.twitter.com/f6RfGu1CRv
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 14, 2023
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या मनोगतातून जागता केला. त्यांच्या राजनीतीचा, युद्धचातुर्याचा पाठ त्यांनी मांडला.

शिवाजी महाराज यांनी रचलेल्या स्वराज्याच्या पायावर संभाजी महाराज यांनी कळस चढवला. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले आहेत, त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी जतन करणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराज १२० लढाया लढले. एकाही लढाईत त्यांचा कधीही पराभव झाला नाही. याच प्रेरणेने नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्रेला स्थान दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.