शेतकऱ्यांना पेरणीवेळी आर्थिक मदत द्यावी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही चिंतेची बाब आहे. त्यातच सध्या पडत असलेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. खरीप हंगाम जवळ येत असून त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ५ लाख शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे.

या सर्वेक्षणानुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप पिकाच्या पेरणी वेळी प्रत्येकी 10 हजार रुपये दिले पाहिजेत, असा निष्कर्ष महाराष्ट्र सरकारच्या या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ५ लाख शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले असून आढळलेल्या बाबींची शिफारस ते राज्य सरकारला करणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून रोखायचे असेल, तर दोन्ही पेरण्यांवेळी प्रत्येक शेतकऱ्याला १० हजार रुपये सरकारने दिले पाहिजेत, असा निष्कर्षही या सर्वेक्षणातून पुढे आला आहे. दरम्यान, हा उपाय सरकार मान्य करणार का, ते पहावे लागेल.