
नेहमी तरुण दिसावे अशी व्यक्तीची इच्छा असते. आजकाल लोक वेळेआधी म्हातारे होत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी ! जर एखाद्या व्यक्तीचे अन्न आणि जीवनशैली चांगली असेल तर त्याचा थेट परिणाम त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर दिसून येतो. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमी सांगतात की तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर सकस अन्न सेवन करावे.
अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी साखरेकडे दुर्लक्ष करा. पांढऱ्या साखरेपासून बनविलेल्या वस्तू किंवा शुद्ध साखरेपासून बनविलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात. पांढरी साखर त्वचा आणि केस दोघांसाठी खूप धोकादायक आहे. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. ज्याचा परिणाम चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो.

भारतात अनेकांना तेलकट आणि तळलेले पदार्थ खायला आवडतात. बरेच लोक ते शिजवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तेल वापरतात. तेल वारंवार गरम करून त्याचा वापर केल्याने आरोग्याची हानी होते. घरी असो किंवा बाहेर, जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे हृदयविकार तर होतोच, पण चेहऱ्यावर वयही दिसू लागते.
बर्गर, फ्रेंच फ्राईज, समोसे, पकोडे, डीप फ्राईड चिकन यांसारख्या पदार्थांपासून शक्य तितके लांब रहावे. या पदार्थांमुळे सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या सुरू होते. दारू आणि सिगारेट हे समाजासाठी वाईट मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते वाईट आहे. या दोन्हीच्या अतिसेवनामुळे त्वचेला इजा होऊ लागते. उन्हाळ्यात तहान शमविण्यासाठी लोक जास्त शीतपेये पितात. बरेच लोक भरपूर शीतपेये तसेच उर्जावर्धक पेये पितात. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. उसाचा रस, ताज्या फळांचा रस, लस्सी, भाज्यांचा रस अशी नैसर्गिक पेये प्यायल्यास त्वचा चमकदार राहते.