नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार
सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले, ”आयटीआय कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून इलेक्ट्रोनिक्स, अवकाश आणि संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.”

दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण याकरिता सामान्य नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने जाहीर केली आहे. यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मदत व पुनर्वसन विभागाला दिले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
राज्यात जातीय तणाव आणि द्वेष निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.