Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर

महाराष्ट्रातील कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. हे देवी स्थानिक लोक ‘अंबाबाई’ म्हणून हिचे पूजन करतात. भारतातील हे मंदिर हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून कोल्हापूर शहरात ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर आहे.

कोल्हापूरचे प्राचीन नाव पुराणात ‘अविमुक्तक्षेत्र’ असे आहे. याचा अर्थ या प्रदेशावर भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मी यांचा सदैव आशीर्वाद आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते.

कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मूर्तीच्या जवळील सिंहआणि शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबेचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट असून त्यावर नागमुद्रा आहे.अकराव्या शतकातील शिलालेखात ‘लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते.

हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या ‘हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी’ मध्ये मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनी आहे, असे नमूद केले आहे.

कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. आत प्रवेश केल्यावर प्रशस्त सभामंडप दिसतो. मंदिराचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा आणि रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथे आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या 3 अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास ‘महानाटमंडप’ असे नामाभिमान आहे. मंदिराचे उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र पाहून मन हरखून जाते.

कोल्हापुरातील असंख्य मंदिरांपैकी महालक्ष्मी किंवा अंबाबाई मंदिर हे सर्वात जास्त पूजनीय आहे. चालुक्य राजा कर्णदेवाने 7 व्या शतकातहे बांधले असून देवीची मूर्ती प्रसन्नता प्रदान करते. मंडपावर बारीक नक्षीकाम केलेले छत आहे.

प्रचलित दंतकथांनुसार, श्री महालक्ष्मीचे पती भगवान व्यंकटेश हे भृगु ऋषींच्या विरुद्ध भयानक कृत्याबद्दल कोणतीही कारवाई करू शकले नाहीत. जेव्हा महालक्ष्मीला हे कळले तेव्हा तिने आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध ‘तिरुमला’ पर्वत सोडला आणि कठोर तपश्चर्या करण्यासाठी ती कोल्हापुरात स्थायिक झाली. आजही देवतेला प्रसन्न करण्यासाठी बालाजी मंदिर प्रशासनाकडून सुंदर साडी अर्पण केली जाते.

किरणोत्सवहे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. कोल्हापुरात वाहतूक व्यवस्था चांगली आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आणि रिक्षा सहज उपलब्ध असतात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *