
भारत प्रशासित काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारपासून ‘जी-20’ सदस्य देशांच्या पर्यटन कार्यगटाची बैठक सुरू झाली आहे. यावर्षी भारताकडे ‘जी-20’ चे अध्यक्षपद असून आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत; मात्र श्रीनगरमध्ये होत असलेल्या या बैठकीबाबत विशेष चर्चा आहे. ऑगस्ट 2019 नंतर प्रथमच काश्मीरमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधून ‘कलम 370’ रद्द केले होते. भारतीय संविधानाच्या ‘कलम ३७०’ नुसार काश्मीरला विशेष दर्जा आहे. याशिवाय केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून राज्याचा दर्जा काढून दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागला होता. श्रीनगरमधील ‘जी-20’ बैठकीच्या माध्यमातून भारताला कदाचित जगाला संदेश द्यायचा आहे की तेथे सर्व काही सामान्य आहे.

श्रीनगरमधील बैठकीला पाकिस्तानने आधीच विरोध केला होता, पण आता चीन, तुर्कस्तान आणि सौदी अरेबियानेही या परिषदेला नकार दिला आहे. इजिप्तला विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते; परंतु इजिप्त देखील या बैठकीला उपस्थित राहिला नाही.