आषाढी वारीसाठी ‘हरित वारी स्वच्छ वारी’चे नियोजन
यावर्षीच्या पंढरपूर आषाढी वारीत ‘हरित वारी स्वच्छ वारी’ या संकल्पनेवर आधारित पर्यावरण साक्षरतेचा जागर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पालखी मार्गावर प्रशासनाकडून मागील वर्षी 10 हजार झाडांची लागवड करण्यात आली होती. यावर्षी जास्त झाडे लागवड करण्यात येणार असून, प्लास्टिक संकलन केंद्र उभा करून पर्यावरणाचा जागर करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व महिला वारकरऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, स्वतंत्र महिला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यांच्या आरोग्य विषयक स्वच्छता तसेच सुरक्षेसाठीच्या विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी संबधित ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेत देण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी पालखी मार्गावर उपलब्ध सुविधेबाबत फलक लावावेत अशा सूचनाही स्वामी यांनी यावेळी दिल्या.

यावर्षी आषाढी एकादशी २९ जून रोजी येणार आहे. आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सभागृहात या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, निवासी उपल्हिाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मंदीर समिचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, कबीर महाराज, राणा महाराज वासकर, विश्वस्त, फडकरी, दिडींकरी, नागरिक, व्यापारी संघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर तसेच संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.