Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

नागरी सेवा परीक्षेत मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल काल, 23 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. इशिता किशोर ही UPSC टॉपर ठरली आहे, तर गरिमा लोहिया हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ९९३ नावांमधील पहिल्या दहामध्ये 6 मुली आहेत. इशिता किशोरने बिहारबाहेर शिक्षण घेतले असले, तरी ती मूळची बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील आहे. इशिता किशोर, गरिमा लोहिया आणि स्मृती मिश्रा यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेला आहे.

UPSC मध्ये 2रा क्रमांक मिळवणारी गरिमा लोहिया देखील बिहारची रहिवासी आहे, गरिमा ही बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बक्सर आणि सनबीम भगवानपूर येथील वुडस्टॉक स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. गरिमाने दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गरिमाने आपल्या यशाचे श्रेय आईला दिले आहे. गरिमाची आई मुलांना सांगते की फक्त दोन तास अभ्यास करा पण पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *