
जगाच्या एकूण वाघांच्या संख्येपैकी 3 चतुर्थांश वाघ भारतात राहतात; परंतु त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश झाल्यामुळे त्यांची संख्या गेल्या दशकांमध्ये लक्षणीयरित्या कमी झाली आहे. सन 1947 मध्ये भारतात 40 हजारांहून अधिक वाघ होते. ही संख्या 2006 मध्ये 1500ने कमी झाली. यावर्षी झालेल्या गणनेत भारतातील वाघांची संख्या 3 हजारांवर पोहोचली आहे.वाघांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात भारताने 52 नवीन व्याघ्र प्रकल्प निर्माण केले आहेत. येथे वृक्षतोडीचे काटेकोरपणे नियमन केले जाते. सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी या संपूर्ण योजनेचा अभ्यास केला आहे. मुख्य संशोधक आकाश लांबा सांगतात की, “जंगले ही प्रचंड कार्बन शोषून घेणारी ठिकाणे आहेत. हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कार्बन उत्सर्जन करणारा देश असून उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे जंगल संवर्धन होत आहे.”
कार्बन उत्सर्जन थांबवून भारताला जो आर्थिक फायदा झाला आहे, तो व्याघ्र संवर्धनावरील एकूण खर्चाच्या एक चतुर्थांश आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा परिणाम आहे. वन्यजीव संरक्षणामध्ये गुंतवणूक केल्याने केवळ निसर्गाचे संरक्षण होत नसून त्याचा समाज आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होतो.