मुंबईतील माझगाव डॉकने यशाची नवी उंची गाठली आहे. केवळ १३ महिन्यांच्या कालावधीत युद्धनौका उभारण्याचा विक्रम केला आहे. ही युद्धनौका नौदलात दाखल झाल्यानंतर ‘आयएनएस महेंद्रगिरी’ असे नाव धारण करणार आहे. या ‘फ्रिगेट’ श्रेणीतील युद्धनौकेचे १ सप्टेंबरला या युद्धनौकेचे जलावतरण होणार आहे.
माझगाव डॉक कारखान्यात तयार होणाऱ्या ‘निलगिरी’ श्रेणीतील अन्य तीन युद्धनौकांचे सप्टेंबर २०१९, मे २०२२ व सप्टेंबर २०२३ मध्ये जलावतरण झाले. त्या तिन्ही युद्धनौकांचा बांधणी कालावधी फार मोठा होता. ‘निलगिरी’ बांधणीसाठी २१ महिने, ‘उदयगिरी’ साठी 3 वर्षे व ‘तारागिरी’ साठी दोन वर्षांचा कालावधी लागला. ‘महेंद्रगिरी’ मात्र कमी वेळेत पूर्ण झाली. सध्या तीन युद्धनौका कोलकात्यातील जीआरएसईमध्ये तयार होत आहेत. आवाजाच्या वेगाने मारा करू शकणाऱ्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राने सज्ज व रडारमध्ये टिपल्या न जाणाऱ्या अशा एकूण सात युद्धनौका देशात तयार होत आहेत.
‘अरबी समुद्र व हिंदी महासागर प्रदेशातील अडथळे लक्षात घेता भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात युद्धनौकांची गरज आहे. भारतात युद्धनौका ताफ्यात दाखल होण्याचा कालावधी सरासरी सहा ते आठ वर्षे आहे. नौदल सातत्याने युद्धनौका निर्मितीवर लक्ष ठेवते. कारखान्यांकडून जलद कामे पूर्ण करुन घेण्याकडे कल असतो.