बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र

महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागात बटाटा शेती केली जाते. बटाटा हे असे पीक आहे, ज्याची साठवणूक केल्यावर कोंब येऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. काश्मीरमध्ये बटाटा साठवणुकीचे एक प्राचीन तंत्र असून ते तेथील शेतकऱ्यांनी आजपावेतो जपून ठेवले आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरचे ‘गुरेझ’ खोरे हे मुसळधार बर्फवृष्टीमुळे सहा महिने जगापासून तुटलेले असते. आताही हे खोरे बर्फाने गोठलेले आहे. सध्या येथील बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. अनेक महिने भाजीपाला सुरक्षित ठेवण्याचे येथील शेतकऱ्यांचे एक खास तंत्र आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 8,000 फूट उंचीवर असलेल्या उत्तर काश्मीरच्या या भागात बटाट्यांची सुरक्षित साठवणूक चांगल्या पद्धतीने केली जाते. या पद्धतीविषयी येथील शेतकऱ्यांकडून माहिती मिळते. ते म्हणतात की, बटाटे खोदल्यानंतर आम्ही ते जमिनीत खोलवर गाडतो. आमचे पूर्वज हेच करायचे आणि आम्हीही तेच करतो. बटाटे जमिनीत गाडूनही ताजे आणि पौष्टिक राहतात. येथे राहणाऱ्या लोकांनी अनेक शतकांपासून या पद्धतीचा वापर चालू ठेवला आहे.
बटाट्यांचे संरक्षण करण्याचे तंत्र टिकवून ठेवले आहे. त्यांच्या प्राचीन शेतीची ओळख आता जगाला होत आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना प्रतिसाद देण्यास हे तंत्र मदत करू शकते. शेकडो शेतकरी हिवाळ्याच्या महिन्यांत हे तंत्र वापरतात. अजूनही शेतीमध्ये पूर्वजांचे ज्ञान आणि परंपरा त्यांनी जिवंत ठेवली आहे. इथले शेतकरी हिवाळा येताच कामाला लागतात. जमिनी खोल खणतात. अनुकूल तापमान आणि आर्द्रता राखण्यासाठी बटाटे गवत किंवा पेंढ्याने झाकलेल्या या खड्ड्यात ठेवले जातात. कृषी विज्ञान केंद्र, गुरेझ येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बिलाल याविषयी सांगतात की, शेतकरी जमिनीत खोलवर बटाटे ठेवतात. त्यांना किती उत्पादन साठवायचे आहे यावर हे अवलंबून असते. भूमिगत जागेमध्ये कधी-कधी पाच हजार किलो बटाटेही असू शकतात. गोठलेल्या बर्फाखाली बटाटे टिकवून ठेवण्याची पद्धत ही एक उत्तम पद्धत आहे, जी गुरेझमधील लोकांना त्या भागातील हवामान परिस्थितीशी सामना करण्यास आणि हिवाळ्याच्या हंगामात ताजे बटाटे देण्यास मदत करते. शेतकरी बियाण्यासाठीही बटाटे जमिनीखाली ठेवतात.
जमिनीखालील तापमान बाहेरच्या तुलनेत जास्त असते. ‘गुरेझ’ खोऱ्यातील पिकांचा हंगाम फक्त चार ते पाच महिन्यांचा असतो. बर्फवृष्टी संपल्यानंतर लोक पुन्हा पुढील पीक चक्रासाठी त्यांच्या शेतात बटाटे पेरतात. गुरेझ खोरे हे उच्च दर्जाच्या बटाट्यांसाठी ओळखले जाते. दरवर्षी 15,000 टन बटाट्याचे उत्पादन करते. येथील शेतकरी सेंद्रिय खत, जंगलातील कचरा आणि वनस्पतींचे अवशेष माती समृद्ध करण्यासाठी वापरतात. सध्या येथे सुमारे सहा महिने येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. या प्रदेशामुळे घाटीकडे जाणारे उंच मार्ग आणि डोंगराळ रस्ते बंद होतात. येथे जे काही पिकवले जाते ते शक्य तितके टिकते. गुरेझमधील तापमान काहीवेळा तापमान उणे २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. भाज्या हिवाळ्यात ताज्या ठेवण्याचा ‘भूमिगत साठा’ हा एक प्रभावी मार्ग आहे. शेतकरी सांगतात की, बटाटे हे हिवाळ्यातील पोषणाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
गोठलेल्या जमिनीखाली बटाटे साठवणे म्हणजे केवळ ताजे ठेवणे नव्हे तर, आपल्या पूर्वजांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा हा एक मार्ग आहे. गुरेझ खोऱ्यातील सुमारे 40,000 लोक हिवाळ्यासाठी साठवलेल्या भाज्यांवर अवलंबून असतात. प्रत्येक घरातील बटाटे साठवले जातात. ती त्यांची जीवनवाहिनी असते. हे तंत्रज्ञान बटाटे नैसर्गिकरित्या जतन करतात. त्यांचा ताजेपणा आणि पौष्टिक मूल्य टिकवून ठेवतात. ते किफायतशीर असतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध घटकांचा वापर करुन ऊर्जेचा वापर कमी करतात. ‘पेप्सिको’ सारख्या दिग्गज कंपनीने आपल्या ‘लेज चिप्स’ ब्रँडसाठी गुरेझमधील शेतकऱ्यांकडून थेट बटाटे खरेदी करण्याची योजना आखली आहे.