ॲल्युमिनीयम वर्क्स

पूर्वी घरांना, आस्थापनांना उघडझाप करायचे लाकडी दरवाजे असायचे. आता त्याऐवजी ॲल्युमिनीयमचे सरकते दरवाजे आले आहेत. हे दरवाजे एका साध्या आणि प्रभावी यंत्रणेवर चालतात. यात दोन किंवा अधिक ॲल्युमिनीयमचे ट्रॅक असून त्यावरुन काचेच्या खिडक्या सरकवल्या जातात. सरकते दरवाजे गंजत नाहीत. ते कारागिराकडून काढून घेऊन स्वच्छ करुन पुन्हा बसविता येतात. त्यांची अखंड कार्यक्षमता आणि नैसर्गिक प्रकाशाने खोली व्यापून टकण्याची क्षमता यामुळे या खिडक्या लोकप्रिय बनल्या आहेत. या खिडक्यांमुळे घरातील हवा खेळती राहते. सरकते दरवाजे हा घराचे नूतनीकरण करण्याचा एक कार्यक्षम आणि सहज मार्ग लोकांना मिळाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय चांगला लोकप्रिय झाला आहे. सरकते स्लायडिंगचे दरवाजे फायदेशीर असतात. घरमालकांना खोलीत फर्निचर कसे व्यवस्थित करावे, आणि ते त्याची जागा कशी वापरतात याविषयी अधिक स्वातंत्र्य असते.
सरकत्या दारांमध्ये काचेची तावदाने बसविली जातात. ते नैसर्गिक प्रकाश वाढवण्यास आणि घरात मोकळेपणा ठेवण्यात मदत करतात. सरकते दरवाजे सोयीस्कर आहेत. त्यांना उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी कमीतकमी प्रयत्न करावे लागतात. सरकणारे दरवाजे, खिडक्या सहज सुरेखपणा देतात. त्यांची रचना सर्व वापरकर्त्यांना समजणारी असते. सरकत्या दरवाजांचे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक आहे. सरकत्या दारांची काळजी घेणे हे एक जलद आणि सोपे काम आहे. ट्रॅक्स आणि रोलर्स नियमितपणे साबण आणि पाण्याने स्वच्छ केल्याने दरवाजे सुरळीतपणे सरकण्यास मदत होते. ही साधी देखभाल आणि निगा खिडक्या आणि दरवाज्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि त्यांचे शोभिवंत स्वरूप टिकवून ठेवण्यास मदत करते.
या व्यवसायासाठी नवीनतम पिढीचे लॉक, हँडल, आकर्षक दरवाजे, जाळ्या, ट्रॅक, विविध प्रकारच्या काचा आवश्यक असतात. शहरांमध्ये हा कच्चा माल पुरविणारी दुकाने असतात. या खिडक्या बनविण्यासाठी चांगल्या कारागिराकडे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. या कामासाठी गणितातील फूट, मीटर अर्थात मोजमाप उत्तम जमणे आवश्यक असते. तसेच हे काम साहसाचे, जोखमीचे आणि शारीरिक श्रमाचेही आहे. बहुमजली इमारतींच्या खिडक्या लावताना साहस गरजेचे असते. काचा असल्याने फार काळजीपूर्वक काम करावे लागते. माप घेताना त्यात अचूकता असायला हवी. अन्यथा संपूर्ण काम बिघडून जाते. पहिले माप चुकल्यास त्या मापात कापलेल्या काचा त्याच कामासाठी पुन्हा वापरता येत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होते. या व्यवसायात दोन माणसांची गरज असते. त्यात निदान एक कारागीर आणि एक मदतनीस आवश्यकच असतो. अलीकडे अनेक तरुण हा व्यवसाय करु लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही रोजगार मिळू लागला आहे. या व्यवसायातही यंत्रांची गरज असते. व्यवसायात जम बसू लागला की या यंत्रांची खरेदी करु शकता; परंतु जास्तकरुन हा व्यवसाय आजही मनुष्यबळावरच अवलंबून आहे. यंत्रे फक्त साहित्य कापण्यासाठी, जोडण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे या व्यवसायात अनेकजणांना रोजगार मिळतो.