सिंधुदुर्गातील गावपळण

सिंधुदुर्गात गावपळण ही एक पारंपरिक प्रथा आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात ही प्रथा सुरू आहे. सध्या या गावातील गावपळणीला सुरुवात झाली आहे. आता हे गाव पाच दिवस निर्मनुष्य असणार आहे. येथील ग्रामस्थ पाच दिवस वेशीबाहेर वसणार आहेत. हा गाव 450 वर्षांची परंपरा जपत आहे. सध्या शिराळेवासीय सोबत धान्य, पाळीव प्राणी घेऊन गावातून बाहेर पडले आहेत. आता ते गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी राहुट्या घालून त्यात विसावले आहेत. विशेष म्हणजे गावात शाळासुद्धा भरत नाही. ती सुद्धा गावाबाहेर भरवली जाते.
ही गावपळण करण्यापूर्वी ग्रामस्थ देवाला कौल लावतात. त्यानंतर सर्व लोक गावाबाहेर बाहेर पडतात. गावपळणीच्या वेळी देवाला कौल लावूनच गावाबाहेर लोक पडतात. ही गावपळण तीन, पाच किंवा सात दिवसांची असते. शिराळे गावच्या प्रथेनुसार वर्षातून एकदा गाव सोडावा लागतो. पाच दिवस गावात कोणीही माणूस थांबत नाही. यावेळी जनावरे, पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरेढोरे, यांना सर्व वेशींबाहेर घेऊन जावे लागते. या गावपळणीसाठी चाकरमानी, माहेरवाशीणी येतात. गावपळणीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानी, माहेरवाशीणी देखील उपस्थित असतात. अर्थात, या गावपळणीचा आनंद सगळेजण अगदी आनंदाने घेत असतात.