सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी
Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 124
सह्याद्री मराठी वाहिनी
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क

बातमी पाठवा

Menu

  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • उपक्रम
    • पुरस्कार
    • परिवार
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्‍यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • नवे आकर्षण
    • मनोरंजन
    • पर्यटन
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • खरेदी करा
  • संपर्क
  • Home/
  • शेती/
  • प्राचीन भारतातील शेती

प्राचीन भारतातील शेती

by सह्याद्री मराठी वृत्त 25 January 2024 0 Comments
25Jan, 2024

श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे मानले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन मिळायचे. सध्या सर्वत्र श्रीरामांची चर्चा सुरू आहे. रामाशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पना करणे अर्थहीन आहे. भारतात रामराज्य असताना शेती कशी होती, त्यावेळच्या शेतकऱ्यांनी ती कशा पद्धतीने केली, असे पश्न विचारले जातात. भारत हा अनादी काळापासून कृषीप्रधान देश आहे. भारतात भगवान राम आणि कृष्णाच्या काळातही शेतकरी शेती करीत होते. याचे पुरावे पौराणिक संदर्भांत आढळतात. भारतात राम आणि कृष्ण युगापूर्वीही शेती होत होती. उपनिषदे, पुराणांमध्ये, वेदांमध्ये शेतीचा, गाईगुरांचा उल्लेख आढळतो. त्यानुसार त्या काळी लोक शेत नांगरीत. जमिनीत धान्य व भाजीपाला पिकवीत. गुरे पाळत व शेळीपालन करीत.

जगातील प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये शेतीचा उल्लेख आढळतो. अश्विन देवतांनी राजा मनूला नांगरणी करायला शिकवल्याचा उल्लेख यात आहे. ऋग्वेदातील एका ठिकाणी अत्री यांच्याकडे शेताच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली असल्याचे आढळते. अथर्ववेदात राजा पृथुवेन्याने शेती सुरू केली होती, असे आढळते. तसेच बैलांच्या जोडीने नांगरणी केल्याचेसुद्धा वर्णन आहे. यजुर्वेदात ‘महाब्राही’, ‘कृष्णवराही’, ‘शुक्लारुही’, ‘आशुधन्य’ आणि ‘हयान’ या तांदळाच्या प्रमुख जाती होत्या. वैदिक काळातही भाताची लागवड केली जात असे. रामायण काळात राजा जनक यांना शेतात नांगरताना माता सीता सापडली. राजा जमीन नांगरत होते, यावरुन शेतीला किती महत्व होते, हे दिसून येते. महाभारतात बलरामजींच्या खादं्यावर नेहमी नांबर दिसतो. यावरून त्या काळीही शेती खूप प्रगत होती, हे समजते. सिंधू संस्कृती अतिशय प्रगत आणि सुसंस्कृत मानली जाते.

सिंधू संस्कृती ही पूर्णपणे स्वावलंबी होती. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून असे दिसून येते की त्या काळातील लोकांना कृषी, पशुसंवर्धन याची खूप चांगली समज होती. या काळात जहाज, रथ, बैलगाडी इत्यादी वाहतुकीची साधने लोक चांगल्या प्रकारे वापरायला शिकले होते. सिंधू संस्कृतीतील लोकांनी शेतीसोबतच गायपालन, शेळीपालनही उत्कृष्ट केले. भारतात किमान 7000 ते 13000 वर्षांपूर्वी शेतीचा विकास झाला होता. तेव्हापासून शेतीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. नवाश्मयुगात माणसाने कंद, मुळे, फळे आणि स्वत: पिकवलेले धान्य वापरण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी हळूहळू शेती आणि अन्न उत्पादन सुरू केले. मनुष्याला पाषाणयुगापूर्वीपासून शेतीची ओळख होती. नांगरात बैलांचा वापर करून नांगरणी केल्याचा पुरावा इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतही सापडतो. भारतातील शेती प्रगत अवस्थेत होती. त्या काळात लोक धान्याच्या रूपात महसूल भरत. सिंधू संस्कृतीमध्ये गहू आणि बार्लीचाही उल्लेख आढळतो. ज्वारी, बाजरी, कोंडो, कुटकी, इत्यादी भरडधान्ये भारतात पिकवीत.

‘पराशर’ नावाचे ऋषी भारतात होऊन गेले. त्यांनी ‘पराशर तंत्र’, ‘कृषिसंग्रह’, ‘कृषी पराशर’ हे ग्रंथ लिहिले. ‘कृषी पराशर’ मध्ये ग्रह-नक्षत्रांचा शेतीवर होणारा परिणाम, ढग आणि त्यांच्या प्रजाती, पावसाचे मोजमाप, पावसाचा अंदाज, वेगवेगळ्या काळातील पावसाचा परिणाम, शेतीची काळजी, बैलांची सुरक्षितता, शेणखत, नांगरणी यांची माहिती दिली आहे. पराशर ऋषींना शेतीबद्दल नितांत प्रेम होते. बियाणे केव्हा आणि कसे जतन करावे, पराशर ऋषींच्या ग्रंथात ढगांचे प्रकार आणि विविध ऋतूंमध्ये होणारा पाऊस यांचीही माहिती दिली आहे. गोठ्याची स्वच्छता, प्राणी, शुद्ध आणि जतन केलेले बियाणे योग्य वेळी पेरण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जलसंधारणाचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात, शेती आणि पशुपालन हा लोकांच्या राहणीमानाचा प्रमुख भाग आहे. भारत नेहमीच धान्यांनी भरलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळातही भारतात दूध मुबलक होते. त्याकाळातही शेती आणि पशूपालन जीवनाचा प्रमुख आधार होते.

Next
समारंभांचे चित्रीकरण
January 25, 2024
Previous
मोबाईल फोन असेंबलिंग प्लांट
January 25, 2024
Leave A Comment: Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणत्याही गोष्टीची बातमी नं करता, नकारात्मक मजकूर टाळून, उमेद आणि बळ वाढविणारे सकारात्मक विचार, बातम्या आणि माहिती देणे, हाच उद्देश आहे. पत्रकारितेचे ध्येय, उद्देश, कर्तव्य, जबाबदारी आणि मर्यादा आम्ही जाणतो. एक जागृत माध्यम म्हणून आमची एक ठाम भूमिका आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास अबाधीत राहण्यासाठी, काय प्रसारीत करावे आणि काय करु नये याचे आम्हाला पूर्ण भान आहे.

   sahyadrimarathi@gmail.com

   hr.sahyadrimarathi@gmail.com

    सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

   मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर घोषणा

23 May 2025
किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

किश्तवाडमध्ये भारतीय लष्कराचे ऑपरेशन त्राशी सुरूच

23 May 2025
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांत वाढ

23 May 2025
दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा कहर

22 May 2025
ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

ग्रीसमधील कासोस बेटाजवळ भूकंपाचा धक्का

22 May 2025
चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

चीन आर्थिक कॉरिडॉरचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करणार

22 May 2025

लोकप्रिय श्रेण्या

  • अर्थकारण 4
  • आजचे पंचांग 1
  • आमच्याबद्दल 0
  • उपक्रम 3
  • जिगरबाज 11
  • जीवनशैली 1
  • नवे आकर्षण 126
  • पर्यटन 424
  • बातम्या 0
  • मनोरंजन 91
  • महाराष्ट्र 1143
  • माहिती 38
  • मुलाखत 0
  • राशी दिनमान 0
  • लोकप्रिय उत्पादने 0
  • वेचक - वेधक 67
  • संमिश्र 4
  • संस्था परिचय 34
  • सह्याद्री परिवार 2

अस्वीकरण      |       कुकी धोरण      |       गोपनीयता धोरण      |       अटी व शर्ती      |       परतावा धोरण      |       साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकसित आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.

सह्याद्री मराठी वाहिनी

Typically replies within minutes

Any questions related to प्राचीन भारतातील शेती?

🟢 Online | Privacy policy

व्हॉट्स अप संदेश पाठवा !