मार्च महिन्यात आरोग्य सांभाळा

मार्च महिना सुरू झाला असून हिवाळा जवळपास संपत आला आहे. या महिन्यात तापमानात सतत चढ-उतार होत असल्यामुळे लोक अनेक प्रकारच्या संसर्गाला बळी पडतात.  सर्दी आणि खोकल्याची प्रकरणे झपाट्याने वाढतात. फ्लूच्या हंगामात लोकांना सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे आणि दुखणे, नाक वाहणे, इत्यादी संसर्ग होण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत खूप कफ तयार होतो. नंतर छातीत जडपणा येतो.

यावर  वेळीच उपचार न घेतल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. अशा परिस्थितीत सर्दी-खोकल्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होऊन बसते. यावर आले, गूळ, तुळस आणि काळी मिरी खूप फायदेशीर आहे. यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो आणि छातीतील कफ दूर होण्यासही मदत होते. या दिवसात ओट्स खावेत. त्यामध्ये असलेली प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात.  त्यामुळे सर्दी आणि खोकल्याशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. एवढेच नाही, तर रक्तदाब  सामान्य  ठेवण्यासही मदत होते.

मांस, मटण, चिकन किंवा चिकन सूप यांसारख्या गरम मसाल्यांनी बनविलेले पदार्थ सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. अँटिऑक्सिडंटयुक्त चहा घशातील खवखव शांत करते.  श्लेष्मा पातळ करते.  यामुळे नाक बंद होण्यापासून आराम मिळतो. या परिस्थितीत मधसुद्धा चांगले असते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *