महाभारत पर्वातील एक योद्धा, जो भळभळत्या जखमा अंगावर घेऊन आजही वावरतो आहे, असे म्हणतात. या अश्वत्थामाच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. ॲमेझॉन प्राईमने ‘अश्वत्थामा : द सागा कंटीन्यूज’ चित्रपट बनविण्याची घोषणा केली आहे. यावेळेस चित्रपटातील अभिनेता बदलण्यात आला आहे.
या चित्रपटासाठी अभिनेता शाहिद कपूरची निवड करण्यात आली असून तो अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती वासू भगनानी करणार आहेत. शाहिद कपूरने समाजमाध्यमांवर याबद्दल माहिती दिली आहे.
द्वापारयुगात अश्वत्थामाचा जन्म झाला. हा गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता. शास्त्र आणि शस्त्रास्त्रांमध्ये तो निपुण होता. महाभारताच्या युद्धात धृष्टद्युम्नने द्रोणाचार्यांचा वध केला. यामुळे अश्वत्थामाने पांडवपुत्रांचा वध केला. अभिमन्यूच्या पुत्राचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला भळभळत्या जखमा घेऊन पृथ्वीवर भटकण्याचा शाप दिला. तेव्हापासून अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे, असे मानतात.