धान्य साठविण्याच्या पद्धती

साठवणुकीची योग्य माहिती नसल्यामुळे ओलावा, कीटक आणि उंदीर यांच्यामुळे धान्याची नासाडी होते. कापणीपासून पुढच्या पेरणीपर्यंत किंवा कापणीपासून विक्रीपर्यंत धान्य साठवून ठेवावे लागते. त्यामुळे धान्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी साठवणुकीच्या उत्तम पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे असते. योग्य माहितीच्या अभावामुळे, 10 ते 15 टक्के धान्य ओलावा व जीवजंतूंमुळे नष्ट होते. धान्य साठवण्यासाठी गोदाम स्वच्छ करावे. आतील जुने अवशेष, अन्य टाकावू सामग्री बाहेर काढून जाळून नष्ट करावी. भिंती, फरशी तसेच जमिनीत भेगा पडल्या असतील तर त्या सिमेंट किंवा विटांनी बंद कराव्यात. भेगा गेलेल्या भिंतीही लिंपाव्यात.”
“धान्य पूर्णपणे स्वच्छ करून उन्हात वाळवावे. दाण्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा नसावा. जास्त ओलावा असल्यास बुरशी आणि कीटकांचा हल्ला वाढतो. दाणे सुकल्यानंतर ते दाताने कट्कन तुटल्याचा आवाज आला की दाणे तयार झाले असल्याचे समजावे. गोदामांमध्ये कोरडेपणा असावा. “जिथे ओलसरपणा नसेल आणि अन्न उंदरांपासून मुक्त असेल, अशा जागी धान्य ठेवावे. धान्य ठेवलेली जागा हवेशीर असावी.
गोण्यांमध्ये धान्य भरण्यापूर्वी या गोण्या 20-25 मिनिटे उकळत्या पाण्यात टाकाव्यात. त्यानंतर तेत्या कडक उन्हात चांगल्या वाळवाव्यात, किंवा फवारणीसाठी तयार केलेल्या ५० टक्के मॅलेथिऑनच्या द्रावणात गोणी बुडवावी. नंतर बाहेर काढून कडक वाळवावी. ती व्यवस्थित सुकल्यानंतरच त्यात धान्य भरावे. धान्य नेहमी भांडारात ठेवावे. त्यासाठी वीस ते पंचवीस सेंटीमीटर उंचीवर बांबू किंवा लाकडी फळीची जागा तयार करावी, ती भिंतीपासून किमान ७५ सेमी अंतरावर असावी. गोण्यांच्या कड्यांमध्ये ७५ सें.मी. मोकळी जागा ठेवणे देखील फायदेशीर आहे.
ढगाळ, पावसाळी किंवा वातावरणात जास्त ओलावा असताना साठवणूक करू नये. खुल्या धान्यावर द्रव कीटकनाशकांचा थेट वापर करू नये. उंदीर मारण्याचे सापळे आणि गोळ्यांचा आळीपाळीने वापर करावा. धान्यामध्ये औषध टाकल्यानंतर हात साबणाने चांगले धुवावेत. साठवणुकीतील जुने धान्य विक्रीपूर्वी एक महिना अगोदर स्वच्छ करावे. उंदरांनी काढलेली छिद्रे नाहीशी करावीत. धान्यावर कडुलिंबाची प्रक्रिया करावी. साठवण व्यवस्थित करावी. यामुळे लपलेल्या कीटकांचा नाश होईल. अन्नधान्य साठवताना वाऱ्याची दिशा लक्षात ठेवा. पूर्वेकडून वारे वाहत असल्यास अन्नधान्य साठवू नका. कडुलिंबाची पाने धान्य साठवण्यासाठी वापरताना कडुलिंबाची पाने कोरडी असावीत. यासाठी ठेवण्यापूर्वी कडुलिंबाची पाने कागदावर सावलीच्या ठिकाणी 15 दिवस वाळवावीत.