उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा ऋतू आहे. कच्चे आंबे अर्थात कैरी तर सर्वांनाच प्रिय असते. कैरीवर तिखट आणि काळे मीठ लावून खाणे या कल्पनेनेच आजही तोंडाला पाणी सुटते. ही कैरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हटले जाते. यामध्ये ‘क’ जीवनसत्व, ‘ए’ जीवनसत्व, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कैरी खाल्यामुळे पचनशक्ती वाढते. आतडे निरोगी राहण्यास मदत होते, एवढेच नाही, तर उन्हाळ्यात कैरीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
कैरीचे पन्हे, कैरी, पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी असे अनेक प्रकार बनवून आपण सेवन करू शकता. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम येतो. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत कच्च्या कैरीपासून बनविलेले कैरीचे पन्हे शरीराला जलसंपृक्त ठेवण्यास मदत करते. कच्च्या आंब्यामध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण करणारे गुणधर्म असल्यामुळे ते उन्हाळ्यासाठी अतिशय फायदेशीर पेय मानले जाते.
हे शरीरातील सोडियमसारख्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करण्यास मदत करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्याबरोबरच ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते. यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यास मदत होते, कैरीचे सेवन केल्याने वजन कमी होते. यामुळे गॅस्ट्रो-इंटेस्टाइनल विकार कमी होण्यास मदत होते. चरबीचे शोषण वाढते, हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे कैरीचे सेवन यकृत आणि आतड्यांसंबंधी समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.