बांबोळी किनारा

बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे, या किनाऱ्यावर तुम्हाला जास्त विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. येथे नारळाची झाडे आणि अरबी समुद्राच्या पाण्याने धुतलेल्या सोनेरी वाळूचा लांब पट्टा आहे. येथे तुम्ही कोणत्याही दिवशी कामात गर्क असलेल्या मच्छिमार बांधवांना देखील पहाल.

या किनाऱ्यावर आपण छान छायाचित्रे घेऊ शकता. येथे शॅक्स किंवा इतर निवास पर्याय नाहीत. ऑक्टोबर ते मार्च हा या किनाऱ्याला भेट देण्यासाठीचा सर्वोत्तम काळ आहे, कारण यावेळी येथील हवामान आल्हाददायक आणि आरामदायक असते. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी तुम्ही टॅक्सी किंवा इतर खासगी वाहने भाड्याने घेऊ शकता.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *