पदरगड किल्ला

कर्जतमार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगडावरील २ कातळ सुळक्यांना औरंगजेबाने पेठचा किल्ला घेताना आजूबाजूचे किल्लेही घेतले. त्यावेळी पदरगड त्याने पुन्हा बांधून घेतल्याचे सांगतात.

पदरगडावर चढताना ‘चिमणी क्लाईंब’ व त्यानंतर प्रस्तरारोहण करावे लागते. त्यानंतर गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर खिंड मिळते. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा आहे. या गुहेत ५-७ माणसे राहू शकतात. डाव्या बाजूलाही कातळात कोरलेली छोटी गुहा दिसते. या गुहेत एकच माणूस बसेल एवढी जागा आहे. या खिंडीतून गडमाथ्यावर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. यातील काही पायर्या आता नाहीशा झाल्या आहेत. या पायर्या चढून गेल्यावर गडमाथ्यावर पोहोचता येते.

गडमाथ्‌याच्या पहिल्या भागात छोटे पठार असून त्यावर कातळात कोरलेली पाण्याची बुजलेली टाकी आहेत. येथे वास्तूंचे दोन चौथरे पहायला मिळतात. गडमाथ्याच्या दुसर्या भागात एकमेकांपासून २ कातळाचे सुळके आहेत. पहिल्या सुळक्याच्या खाली कातळात खोदलेले १ पाण्याचे टाक व वास्तूचा चौथरा आहे. इथून पुढे खोदलेली १०-१२ जणांची राहण्याची सोय होऊ शकणारी मोठी गुहा आहे. गडावरील पाण्याची टाकी बुजलेली असल्यामुळे येथे पिण्याचे पाणी नाही.

खांडस गावातून पदरगडावर जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. उतरण्यासही तेवढाच वेळ लागतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *