‘वीर मुरारबाजी..पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारी एक जोडी पहायला मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती भाऊसाहेब आरेकर यांची आहे. अजय-अनिरुद्ध यांनी दिग्दर्शन केले आहे.
दूरदर्शनवरील रामायणात श्रीराम व माता सीता यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील; मात्र ते नेमकी कोणती पात्रे साकारणार याविषयी निश्चित माहिती समोर आलेली नाही.
चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन असेल. या दोघांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पहायला मिळणे, हा चाहत्यांसाठी सुखद धक्का आहे. यामध्ये पुरंदरच्या लढाईत पराक्रम गाजविणारे शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा पाहण्यास मिळणार आहे.