लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात.
हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री 9 वा.पर्यंत खुले असते. मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कधीही जाणे चांगले. हे मंदिर मानवी वस्तीपासून दूर आहे. पावसाळा तसेच हिवाळ्यात येथे निसर्गरम्यता असते. औसा बसस्थानकावरून खासगी वाहने तसेच मंदिर ट्रस्टचीही खासगी वाहने असतात.
हे मंदिर लातूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर डोंगरांनी वेढलेले आहे. येथे गेल्यास या गावात एक प्राचीन किल्ला आपण पाहू शकता. सुमारे 300 वर्षे जुने असणारे वीरनाथ महाराजांचे मंदिर येथे आहे. येथेच भगवान गणेश, भगवान शिव, भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणी यांचीही मंदिरे आहेत. दर शुक्रवारी येथे महाप्रसाद असतो.