मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता गश्मीर महाजनी याने यावेळी धक्कादायक खुलासा केला आहे. गश्मीरचे वडील अर्थात अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर या अभिनेत्याला खूप ट्रोल केले गेले. वडिलांना एकटे ठेवल्याबद्दल अनेकांनी त्याला सुनावले होते.
गश्मीर महाजनी याने आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच गश्मीर महाजनी याने एका युट्युब वाहिनीला मुलाखत दिली. यात त्याने आत्महत्येचा विचार करत होतो, असे सांगितले आहे.
गश्मीर महाजनी म्हणाला की, रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. निधनाच्या दोन आठवड्यांनी त्याच्यात आणि आईमध्ये बरेच मोठे वाद झाले. त्यावेळी त्यालाही खूप राग आला होता. त्याक्षणी त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता. पण, त्यावेळी मुलाचा विचार मनात आला. त्याचा विचार आला नसता, तर सगळे संपले असते.’