महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिरांच्या यादीमध्ये महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणावरील हे मंदिर भाविकांसाठी एक छान अनुभूती आहे. येथे पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर बांधलेले हे प्राचीन मंदिर फारच सुंदर आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे या नद्यांचे पाणी मिसळून गायमुखाच्या मूर्तीतून बाहेर पडते, लोक हे पाणी बाटल्यांमध्ये भरुन घरी नेतात. मुळात हे मंदिर 13 व्या शतकातील आहे. 16व्या आणि 17व्या शतकात त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
या मंदिराबाबत पौराणिक कथा सांगितल्या जातात. हे मंदिर म्हणजे सुंदर स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य आहे. पंचगंगा मंदिरात या पाच पवित्र नद्यांचे शुद्ध आणि थंड पाणी असलेले दोन संगमरवरी तलाव आहेत.
दोन्ही तलावांवरील गाईची मूर्ती ‘गायमुख’ म्हणूनही ओळखली जाते, सर्व वयोगटातील लोकांना किमान एकदा तरी पंचगंगा मंदिरात जाण्यास प्रोत्साहित करते. येथे भगवान विष्णूच्या मूर्तीसह पाच लहान सभागृहदेखील आहेत.जी पर्यटकांना आकर्षित करतात.