सुख कळले

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत नवरा-बायकोमधील प्रेम, विश्वास, एकमेकांना साथ देण्याची वृत्ती यामुळे मिथीला आणि माधव यांचे दांपत्य जीवन रसिकांच्या मनाचा ठाव घेत होते. एवढ्यातच माधवचा मृत्यू होतो, आणि मिथीलास दु:खाचा सामना करावा लागतो. मात्र, या प्रवासात तिला कुटुंबाची साथ मिळते. आता पुढील भागांमध्ये स्वतंत्र विचारांची, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती मिथीला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. आजच्या महिलांसाठी हा प्रवास प्रेरणादायी आहे. येत्या १५ ऑगस्टपासून हा नवा प्रवास पहायला मिळणार आहे.
माधवसोबतच्या अन्यायावर आपल्याला कशी मात करता येईल, त्याला न्याय कसा मिळवून देता येईल, असा विचार ती करीत आहे.  या सगळ्या प्रवासात तिच्या व्यक्तीमत्त्वातही बदल होतो.  नव्याचा शोध घेणाऱ्या मिथिलाच्या आयुष्यात अनेक गोष्टींत बदल होतो.
या मालिकेत मिथीलाची भूमिका अभिनेत्री स्पृहा जोशी साकारत आहे मिथीला या व्यक्तीरेखेचा पुढचा प्रवास खूपच मनोरंजक असणार आहे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *