वीज कंत्राटी कामगारांकडून फडणवीस यांचा सत्कार
21Sep, 2024
जोपर्यत असंघटित आणि कंत्राटी कामगार या घटकाला आर्थिक स्थैर्य मिळत नाही, तोपर्यंत विकास पूर्ण होऊ शकत नाही, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
वीज कंत्राटी कामगारांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.समाजात वेगवेगळे घटक आहेत. प्रत्येक घटकासाठी कमी-अधिक प्रमाणात आमच्या सरकारने निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी आणि असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याचा लाभ घेत नियमित कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगारांनाही सोयीसुविधा आणि नियम लागू होण्यासाठी आपण आग्रही असून त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वीज कंत्राटी कामगारांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.समाजात वेगवेगळे घटक आहेत. प्रत्येक घटकासाठी कमी-अधिक प्रमाणात आमच्या सरकारने निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी आणि असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याचा लाभ घेत नियमित कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगारांनाही सोयीसुविधा आणि नियम लागू होण्यासाठी आपण आग्रही असून त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘इ श्रम’ पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील असंघटीत आणि कंत्राटी कामगारांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यासाठी योजना आखण्यासाठी ३४ मंडळे सरकारने तयार केली आहेत. असे करणारे हे राज्यातील पहिले सरकार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. कंत्राटदार कामगारांचे एटीएम कार्ड स्वत:कडे घेऊन कामगारांच्या खात्यातून पैसे काढून घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत, असे सांगत अशा कंत्राटदारांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.