सिंगापूरमध्ये भारताचे संपर्क कार्यालय सुरू

देशातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी देशात गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्याकरिता येत्या काही महिन्यांत विविध देशांमध्ये कार्यालये उघडण्याची भारताची योजना आहे. सिंगापूरमध्ये पहिल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी केले. यावेळी ते म्हणाले की, हे कार्यालय गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांसाठी संपर्क बिंदू म्हणून काम करेल.  सिंगापूर भारतासाठी एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. हे कार्यालय सिंगापूर आणि दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेसोबत आर्थिक
सहकार्य मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय आहे. सिंगापूरमध्ये अशा प्रकारचे पहिले कार्यालय उघडणे महत्त्वाचे आहे. कारण तेथून भारताला सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक मिळते. सिंगापूर हे जगातील प्रमुख आर्थिक केंद्रांपैकी एक आहे, ते जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करते, असे ‘डेलॉइट इंडिया’चे अर्थतज्ज्ञ रुम्की मजुमदार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *