भारतात दोन महिने तीव्र वीजटंचाईचा अंदाज

भारतात वीज संकटाची चिंता वाढू लागली आहे. भारतातील आघाडीच्या कंपनीने मे आणि जून महिन्यात तीव्र वीजटंचाईचा अंदाज वर्तवला आहे. देशभरात मे आणि जून महिन्यात तीव्र वीजटंचाईचा अंदाज वर्तवला आहे. ‘नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर’च्या अहवालानुसार, विशेषतः सौरऊर्जेशिवायच्या वेळेत विजेची तीव्र टंचाई असू शकते. यावेळी १५-२० गिगावॅटची कमतरता असू शकते. त्यामुळे भारनियमनाची शक्यता निर्माण होऊ शकते. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उष्णतेचा सामना कसा करावा, याची चिंता भेडसावणार आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, मे महिना विशेषतः कठीण ठरू शकतो. या काळात विजेची मागणी वाढल्याने वीज पुरवठ्यात आणखी समस्या उद्भवू शकतात. ग्रिडवरील दबाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. याअंतर्गत, औद्योगिक आणि व्यावसायिक युनिट्सना गर्दी नसलेल्या वेळेत वीज वापरण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. सौरऊर्जेमुळे दिवसा मागणी पूर्ण होण्यास मदत होते .

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *