
” पाकिस्तान बदलला नाही. दुर्दैवाने, त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्या वाईट सवयी स्वीकारल्या आहेत. २६/११ चा मुंबई हल्ला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. मला वाटते की, तेव्हा सर्व राजकीय पक्षांसह भारतीय जनता म्हणाली होती की, आता पुरे झाले, असे भाष्य
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.
भारत सरकारच्या पाकिस्तान भेटीबद्दल चरोतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात भारतात झालेल्या परिवर्तनाची कबुली दिली.
परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, पाकिस्तान बदललेला नाही. भारत सरकार आता पाकिस्तानबद्दल फारसे बोलत नाही. त्यांच्यावर आपला मौल्यवान वेळ वाया घालवण्याची गरज नाही.
ते पुढे म्हणाले की, सन २०१४ नंतर सरकार बदलले, तेव्हा पाकिस्तानला एक कडक संदेश देण्यात आला की, दहशतवादी कारवाया केल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. या काळात आपण आर्थिक- राजकीयदृष्ट्या विकसित झालो. जगात आपली स्थिती सुधारली.