
रशियाच्या तीन युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. बांगलादेशच्या चितगाव बंदरात ‘अॅडमिरल ट्रिबट्स’, ‘अॅडमिरल पँटेलेयेव’ आणि ‘टँकर पेचेंगा’ ही तीन रशियाच्या नौदलाची जहाजे पोहोचली.भारताचे बांगलादेशशी संबंध बिघडत चालले असताना ही घटना घडत आहे.
बांगलादेशचे लष्करप्रमुख एस.एम. शफिउद्दीन अहमद यांनी अलीकडेच मॉस्कोला भेट दिली होती. त्यानंतर मित्र रशिया बांगलादेशच्या सहकार्याने भारताविरुद्ध कट रचत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने म्हटले आहे की, रशियाचे ध्येय दक्षिण आशिया आणि प्रमुख व्यापार मार्गांपर्यंत धोरणात्मक प्रवेश सुरक्षित करणे आहे. १९७२-७४ च्या युद्धातील घटनांचे स्मरण करण्यासाठी रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या जहाजांनी गेल्या आठवड्यात चितगावला भेट दिली, जेव्हा सोव्हिएत खलाशांनी स्वातंत्र्ययुद्धानंतर बांगलादेशच्या पुनर्बांधणीस मदत केली होती.