व्यापार युद्धामुळे चीनचा दृष्टीकोन बदलला

अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध अधिक तीव्र झाले आहे. अशा परिस्थितीत, भारतासह इतर शेजारी देशांशी असलेल्या संबंधांबाबत चीनच्या दृष्टिकोनात बदल होण्याची चिन्हे आहेत.

चीन दोन्ही देशांच्या राजधान्यांमध्ये लवकरात लवकर हवाई संपर्क स्थापित करण्यास उत्सुक आहेत. भारतीय एजन्सींनी या संदर्भात गती वाढवावी. यावर्षीपासूनच मानसरोवर यात्रा सुरू करण्याच्या अंमलबजावणीबाबत पुढील एक-दोन दिवसांत घोषणा करण्याची तयारी सुरू आहे, असे चीनने द्विपक्षीय चर्चेत भारतीय अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
चीन सरकारने यावर्षी १ जानेवारी ते ९ एप्रिल, २०२५ पर्यंत ८५ हजार भारतीयांना व्हिसा दिला आहेच, परंतु अधिकाधिक भारतीयांना चीनला भेट देण्यासाठी त्यांचे व्हिसा नियम आकर्षक बनविण्याची घोषणाही केली आहे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *