राज्यात पाणी टंचाईचा सामना

एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. उन्हाच्या प्रचंड तापमानासोबतच राज्यातील अनेक धरणे आणि तलावांमधील जलसाठा कमी झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे, तर अनेक ग्रामपंचायतींवर हंडा मोर्चे देखील निघत आहेत. उन्हाळा येण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाण्यासाठी कोणताही उपाय न करण्यामुळे नागरिकांत असंतोष वाढला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अमरावती आणि बडनेरा यांच्या पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहील, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे लोकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेरपिंगळाईजवळ 1500 मिमी व्यासाची पाईपलाइन लाईक झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे अमरावती आणि बडनेरा याठिकाणी जलसंकट निर्माण झाले आहे. 24 तारखेला नियमित पाणी पुरवठा सुरू होईल. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील 776 गावांसाठी तातडीच्या उपाययोजना 50% पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे पाण्याच्या टंचाईचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे, तसेच जनावरांना पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.